>मित्रांनो सांगायला अत्यंत आनंद होतो की “वाँट टु टॉ़क ची स्थलांतर प्रक्रिया पुर्ण झालेली आहे . आता माझे लिखाण
http://www.pvinayak.com
या संस्थळावर उपलब्द्ध असेल . माझ्या फुटकळ लिखाणाला आता स्वत:ची जागा मिळालेली आहे . आपले प्रेम आहेच ,नव्हे आपल्या प्रेमामुळेच मी इथवर आलेलो आहे ,हे प्रेम असेच वृद्धींगत व्हावे हीच नम्र विनंती ..
आपला मित्र
विनायक
बाजार मांडियेला….!
>
”माझा मुलगा ना, आय.आय.टी. करतोय. ” कुठे ना कुठे, कधी ना कधी तरी हे वाक्य तुम्ही ऐकले असेलच. कारण बारावी विज्ञान शाखेतील मुलांपैकी निम्मी मुले आज ”आयआयटी करत आहेत.” ”आयआयटी” त प्रवेश मिळविण्यासाठी अभ्यास करणे याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे आय अय टी करणे .
आयआयटी ,भारतातली सर्वोत्तम अभियांत्रिकी शिक्षण संस्था, या संस्थेतून बाहेर पडणारा विद्यार्थी हा सर्वोत्कृष्टच असतो, असायचा… त्यामुळे तिथे जाण्यासाठी प्रयत्न तर सगळे करायचे. पण, त्याचा इतका बाऊ होत नव्हता. पण, साधारणतः २१ व्या शतकाच्या सुरवातीपासून सारेच बदलत गेले. माणसाच्या आणि समाजाच्या अपेक्षा वाढल्या.. 6 आकडी पगार खुणावू लागले. पण, त्यावेळी स्वत:तल्या क्षमतांची जाणीव करुन घेण्याइतपत वेळ मात्र आपण स्वतःला देऊ इछित नव्हतो. इंस्टट फूड सारखे इंस्टंट शिक्षण आणि पैसा मिळावा असे वाटु लागले . नेमका याचाच फायदा घेऊन आधी कोटा, राजस्थान येते, आणि नंतर संपूर्ण देशभरात आयआयटी क्लासेस सुरू झाले आणि यथावकाश त्यांचा बाजार झाला…
.
किती आहे या बाजाराची व्याप्ती? आजघडीला मला एकटयाला 50-60 आयआयटी प्रशिक्षण संस्था माहिती आहेत. ज्यांची वेगवेगळया शिक्षणविषयक मासिकात पानभर जाहिरात द्यायची क्षमता आहे. गावागावात आणि राज्याराज्यात असणारे शिलेदार वेगळेच….! अख्या भारतातुन साधारणत: 5 लाख विद्यार्थी या परिक्षेला बसतात. आणि, त्यातले कमीत कमी 75 टक्के लोक अशा संस्थांशी निगडीत असतात. आणि, या दोन वर्षासाठी फी 60,000 ते 2 लाख अशी असते. या सगळयांचा विचार केला, तर या क्लासेसची वार्षिक उलाढाल काही हजार कोटीत नक्कीच जाते….
या बाजारमुळे होणारा परिणाम म्हणजे विद्यार्थी, त्यांचे पालक तर नागवले जातात माझ्या काही मित्रांनी कर्ज काढून ही फी भरलेली आहे. हेसुध्दा एकवेळ मान्य केले असते. जर, खर्या अर्थाने या क्लासेसमध्ये शिक्षण मिळाले असते. पण, या सर्व संस्थांनी शिक्षणाच्या मूळ तत्वालाच हरताळ फासला आहे. दहावीत मी एका क्लासला होतो. त्या क्लासमुळे मी 94 टक्के चा 96 टक्के वर तर आलोच, पण माझा 70 टक्के चा एक मित्र 80 टक्केवर आला. आणि, आजही सरांना फोन केला, तर ते आमच्या बॅचचे यश म्हणून माझ्या मित्राचे नाव घेतात. कारण, ही आपली शिक्षण पध्दती आहे. कोणताही शिक्षक आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतो, केला पाहिजे ,शाळेत तर हे व्हायचेच पण अगदी कॉलेजचे शिक्षणही बहुतांशी या तत्त्वावरच आधारलेले असते. या क्लासेसमध्ये या संकल्पनेलाच हरताळ फासलेला आहे. क्लास सुरू झाल्यानंतर काही दिवसातच 100 पैकी ज्या दहा मुलांकडून यशाची अपेक्षा आहे. अशांना वेगळे करून सर्व लक्ष त्यांच्यावर केंद्रीत केले जाते. आणि, त्यांना एक-दोन सोयी देण्यासाठी उरलेल्या 90 जणांचे पैसे वापरले जातात. आणि, इथेच हा बिझनेस होतो कारण अगदी त्या दहाजणांशीही यातल्या कोणत्याही शिक्षकाचे भावनिक नाते तयार होत नाही . कारण ती दहाजण त्यांच्यासाठी फक्त प्रॉडक्ट असतात. ज्यांचे मोठेमोठे फोटो छापून त्यांना पुढच्या वर्षीचा बिझनेस मिळणार असतो. आणि म्हणूनच या क्लासेसचा फॉर्म भरतानाच आम्ही तुमचा फोटो व नाव कधीही व कुठेही वापरू शकतो. असा नियम असतो.
साहजिकच विद्यार्थी हा प्रॉडक्ट बनल्याने आणि त्याचे यश हे एक प्रॉफिट स्टेटमेंट असल्याने मग त्यांच्या यशासाठी एक पॅटर्न बनवला गेला. कोटयात बनलेला हा पॅटर्न आता देशभर पसरलेला आहे. अतिमेहनत आणि काहीसे पाठांतर यावर आधारलेला हा पॅटर्न अर्थातच बिनबुडाचा आहे. आयआयटीमध्ये गेल्यानंतर पहिल्याच वर्षी नापास होणार्या मुलांची वाढलेली संख्या आणि आम्हाला टॅलेन्ट मिळत नाही आहे अशी आयआयटी प्रोफेसर्सची ओरड हे हीच बाब अधोरेखित करते. हे टाळण्यासाठी त्यांनी काही उपाय योजले, मात्र अर्थातच ते अपुरे ठरले.
महत्वाचे म्हणजे या व्यवसायाला अनेक कंगोरे आहेत.आपण आधी त्यांच्या गिर्हाईकांबद्दल पाहु( होय त्यांच्यासाठी ते गिर्हाईकच असतात) .सहसा दक्षिणेकडील माणसे ही बुध्दीवादी असतात. आणि, त्यांना मेंदूशी खेळायला आवडते. त्यामुळे असा समाज हा या क्लासेसचा ”सॉफ्ट टार्गेट” असतो. कारण, हे विद्यार्थी 12 वी नंतर असणार्या परिक्षांचा अभ्यास सहावीपासूनच सुरू करतात. लक्षात घ्या, एका वर्षाला साधारण 50,000 फी धरली, तर फीच रक्कम वाढतेच. पण, ”सरावाच्या जोरावर ते सहज बाजीही मारतात.” सर्वसाधारणपणे, इतर विद्यार्थी जे 2 वर्षात शिकतात, ते हे सहा वर्षात शिकतात. त्यांचा दुसरा सॉफ्ट टार्गेट विभाग म्हणजे उत्तरेकडचा भाग. यासंदर्भात मला जी माहिती मिळाली त्यानुसार या भागात ”हुंडा” व तत्सम पध्दतीचे प्रस्थ हे फार मोठे आहे. आणि, एखाद्यापुढे ”आयआयटी” ही डिग्री लागली की ती रक्कम आपोआप दुप्पट होते. याचा अर्थ, या शिक्षणाचा कोणताही खर्च त्यांना करायचा नसतो. आणि, ज्ञान किती मिळाले त्यांच्याशी त्याचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे अर्थातच क्लासवाल्यांचे फावते. महाराष्ट्र व मध्य भारतात या दोन्ही Extremities नसल्या तरी माध्यम क्रांतीमुळे त्या आपल्यापर्यंत येतात, मोहवतात व आपण अलगद जाळयात अडकतो. मोठमोठे बॅनर ,आर्ट पेपर वर जाहिराती , एम बी ए झालेल्यांचे प्रोफेशनल बोलणे इ. गिर्हाइकाला भुलवणारे फंडे सोबतीला असतातच.
याशिवाय, या काळात विद्यार्थ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्यामुळे त्यांना यश तर मिळत नाहीच पण त्यांचा सर्वांगीण विकासही खुंटतो. पहिली गोष्ट म्हणजे हे क्लासेसवाले कोणत्याही मुलाला आयआयटी करायला देतात. त्याची लेवल तपासणे हे त्यांना गरजेचे वाटत नाही. अर्थात २00/- घेऊन ऍप्टीटयुड टेस्ट होतात. पण, त्या फक्त पैसे काढण्यासाठी आणि बिनकामाच्या असतात. कारण त्यात कमी गुण मिळालेल्यांना ऍडमिशन देताना मी स्वत: पाहिलेले आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे फ्रँचाईजीकरण…. आजकाल या सर्व क्लासेसनी देशभर आपले जाळे विस्तारले आहे ते याच माध्यमातून…. पण त्यामुळे एखाद्या फ्रॅंचाईजी ओनरला प्रॉफिट झाला नाही की तो फ्रॅंचाईजी बंद करतो आणि मुलाना वार्यावर सोडतो. नवीन क्लास पाहिला तर पुन्हा तिथे पुर्ण फी भरायची …म्हणजे जवळपास अशक्यच.. दुसरी गोष्ट अशी की, यातले बहुतांशी शिक्षक हे उत्तर भारतीय वा अतिदक्षिणेकडील असतात. त्यामुळे त्यांच्याशी, त्यंच्या भाषेशी आणि त्यांच्या शिकविण्याच्या पध्दतीशी विद्यार्थ्यांना समरस व्हायला वेळ लागतो. याशिवाय सीबीएसई अभ्यासक्रम जास्त उजवा ठरणे हेदेखील त्याला पोषक ठरते. या सगळयाशी मेळ साधेपर्यंत तो शिक्षकच नोकरी सोडतो. मग पुन्हा दुसरा शिक्षक पुन्हा हे सगळे चक्र…. शेवटी हा बिझनेस आहे, आणि ते पगारी कामगार ,त्यामुळे जिथे जास्त पगार तिथे ते पळतात. जेव्हा हे आपली डिग्री खोटी सांगू शकतात, तिथे बाकी सारेच शक्य आहे, नाही का?
या सर्वांमुळे मुलगा आयआयटी-जेईई पार करणे अवघड जाते . मात्र, तरीही AIEEE आणि CET या इतर परिक्षांचे मार्ग त्यांना खुले असतात. पण, अत्यंत दुर्देवाची गोष्ट अशी की, या क्लासेसच्या सांगण्यावरून मुले कॉलेजला दुय्यम लेखतात. वर्षवर्षभर कॉलेजला जात नाहीत. त्यामुळे त्यांना बेसिक नॉलेजही नसतेच नसते. अर्थात, सर्व कॉलेजसचा याला विरोध आहे. पण, सगळेच गेल्याने नाखुषीनेच त्यांनाही हे मान्य कराव लागलं आणि कॉलेज बुडवण्याला परवानगी द्यावी लागते . आणि या सगळया घोळात विद्यार्थ्यांची अवस्था ”ना घर ना घाट का” अशी होऊन जाते.
या सगळयांचे परिणाम विद्यार्थी भोगतात . बर्याच विद्यार्थ्यांना आपण फसलोय , हे योग्यवेळी लक्षात येते. पण, त्यानंतर वाट बदलणे तितकेसे सोपे नसते.कारण आजकाल असलेली प्रचंड स्पर्धा ,आरक्षण वगैरे सारख्या गोष्टी यामुळे जागा कमी आणि विद्यार्थी जास्त अशी परिस्थिती झाल्याने तो गेलेला काळही फारच महागात पडतो. त्यामुळे, मग त्याचे भविष्य अंधारमय होते. परगावी आलेल्यांना होमसिकपणा येतो, अभ्यास एके अभ्यास केल्याने सर्वांगीण वाढ तर होत नाहीच( काही काही जण तर राज्य बदलतात .उदा . कोटा किंवा हैद्राबाद) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, त्या नवयुवकाचा आत्मविश्वासच नाहिसा होतो, बाकी सारे मिळेल तो मात्र परत मिळणे फार अवघड…
अर्थात, ”हिरा मातीतही चमकतो” त्यामुळे जे खर्या अर्थाने अतिशय बुध्दीमान आहेत ते बहुतेकदा तरतात.पण त्यांच्याही रँकवर फरक पडतो. शेवटी 5,00,000 मुले बसली तरी आयआयटीत 10,000 जणच जाणार आहेत ना? त्यामुळे, टिकणारे कमी आणि गळणारे नेहमीच जास्त असतात. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे आपला खरा अनुभव सांगायला लोक घाबरतात. कचरतात, कदाचित कारण नसताना तो त्यांना त्यांचा पराभव वाटतो. आणि, त्यामुळे पुढ्च्यास ठेच आणि मागचा शहाणा असेही होत नाही आणि अगदी दरवर्षी एका एका क्लासेसमध्ये हजारे मुले प्रवेश घेतात, त्यांचा ”धंदा” बिनदिक्कतपणे चालू राहतो.
हे सगळे पूर्णपणे थांबवता येईल की, याबद्दल मी साशंक आहे. पण, निदान हा बाजार आटोक्यात तरी आणता येईल. यासाठी, सर्व पातळयांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. कपिल सिब्बलानीम ध्ये 80 टक्के मार्कांचा निकष आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो हाणून पाडण्यात आला . या निर्णयामुळे निदान ही फुग 50 टक्क्यांनी कमी झाली असती. याशिवाय, यासंदर्भात महत्वाची पावले स्वत:च आयआयटी उचलु शकतात. या परीक्षासंदर्भात ते स्वतःच मार्गदर्शन करु शकतात. आयआय ई एल.एस. सारख्या परिक्षांबाबत हा मार्ग उपयुक्तरित्या चालू आहे आणि इंटरनेट सारखे माध्यम असताना बहुतांश ठिकाणी हे शक्य आहे. (नाहीतर वेगवेगळे क्लासेस, ई-पेपर, ई-क्लासेस काढून पैसे कमवत आहेतच की) आणि, यातला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे समाज. समाजाचा एकुणच या ”आयआयटी” कडे ,क्लासेसकडे आणि आपल्या पाल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल, तेंव्हा हे प्रश्न आपोआप सुटत जातील.निदान आपले खरे खरे अनुभव शेअर केले तरी फरक पडु शकतो. 14 तास काम करून पैसे कमवणारे यंत्र का एक उत्तम माणूस या दोन पर्यायापैकी जेंव्हा आपल्या पाल्याबद्दल माणूस या पर्यायावर प्रत्येक पालक क्लिक करेल, तेंव्हा सगळचं चांगल होईल.
शेवटी इतकेच की, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण, नजीकच भविष्य ज्या नवयुवकांच्या हातात आहे. त्यांच्या आयुष्याशी या गोष्टी निगडीत आहे. हा! गेली दोन वर्षे मी या बाजारात आहे. कोणत्या जागेवर आहे ते माहित नाही, पण आहे. या दोन वर्षाचा जेंव्हा त्रयस्थपणे विचार केला, तेंव्हा जे जाणवलं ते मांडलं आहे. या विषयात अनेक भाग/मत मतांतरे आहेत. त्यातलं मला जे जाणवलं, जे सार्वत्रिक वाटले ते मांडलं आहे. हेच खरे, असेच करा असा अट्टाहास नाहीच आहे. पण , यावर विचार व्हावा अशी इच्छा आहे. आणि, म्हणूनच पहिल्यांदा मला स्वत: ला माझ्या विचारांशी प्रामाणिक राहता यावं म्हणून माझ्या निकालाआधी हे खरडलं आहे. इतकंच…….. !
विनायक पाचलग
( सदरचा लेख साप्ताहिक साधनाच्या या आठवड्याच्या अंकात प्रकाशित झालेला आहे.)
बोलु कौतुके !!!
>
परि अम्रुतातही पैजा जिंके ||
ही वाणी खर्या अर्थाने खरी ठरणार आहे. आणि त्या आशेपायीच मी हे कौतुकाचे बोल लिहिले आहेत. आता फक्त इतकीच इच्छा आहे की, ज्याप्रमाणे अभिमान गीतात ५00 आवाज ऐकूनही ”एकसंधता” कुठेही तुटलेली नाही तशी ही मराठीची एकसंधता तुटू नये, सर्व क्षेत्रात हे चैतन्य, हा एकसंधपणा असाच वाढत जावो… आणि तमाम जनतेत आपली मराठी अशीच बहरत राहो, बरोबर ना?
काल आज आणि उद्या
>
रंगकर्मी .कॉम साठी मी लिहिलेले हे संपादकीय, जरुर वाचा
तुमचे मत तुम्ही इथेही देऊ शकता
शेवटी इतकेच, एका भल्या हेतूने, कोणत्याही फायदाच्या अपेक्षा न ठेवता हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. नेटच्या माध्यमात नाटकाची पालखी वाहणे, हे प्रचंड जबाबदारीचे काम आहे. याची जाणीव आम्हाला आहे. मात्र, आपण सारे मिळून हे करू शकतो, असा विश्वास आम्हाला वाटतो . ”नेट” ही काळाची गरज आहे व ती ओळखून आपण पावले टाकलेली आहेत. आता काम आपल्या सार्यांचे आहे. काहीतरी चांगले करायची संधी आपल्याला मिळाली आहे. तेंव्हा आपापल्या परीने प्रयत्न करून आपल्या सर्वांच्या ”रंगकर्मी”ला आपण वाढवूया. ज्यायोगे नाटकाला एक नवी पालवी फुटेल आणि आम्हाला वाटते, हेच समाजाच्याही हिताचे आहे . तुमचा सक्रीय सहभाग व पाठिंबा असू द्या एवढीच विनंती …….!”
>हा आमचा आवाज नाहीच …
>नमस्कार
मध्यंतरी सकाळ मध्ये एक लेख आला होता
हमारी जनरेशन की आवाज सुनो म्हणून…
हा लेख इथे पहा
http://72.78.249.107/esakal/20100201/5223598555223866545.htm
त्या लेखाला मी दिलेले हे उत्तर
वरील लेखावर आणि माझ्या लेखावर तुमचे मत काय आहे हे जाणुन घ्यायची प्रचंड इच्छा आहे….
पहा माझे मुद्दे पटतात का…
सध्या टायपिंग ला फ़ार कमी वेळ मिळत आहे ( अभ्यासामुळे ) तेव्हा समजुन घ्या….
>Open Letter to Chetan Bhagat
>
>थर्ड आय
>
शेवटी कसं आहे, एखादी घटना आपण बघतो तशी आपल्याला दिसते. मी काही आमिर खानचा प्रसिद्धी प्रमुख नाही आहे की या चित्रपटाबद्दल इतके चांगले बोलत आहे . पण हा असा चित्रपट आहे की जो आत्तापर्यंतचा सर्वातप्रसिद्धचित्रपटआहे .त्याहुन महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा करोडो लोक असा चित्रपट बघतात तेव्हा प्रत्येकाचा पाहण्याचा नजरिया ,समजायचा नजरिया वेगळा असतो .कुणाला यातल्या संदेशामुळे नवी उमेद मिळते तर कोणी त्यातली आत्महत्याच तेवढी घेतो. आणि मग इथे प्रश्न निर्माण होतो ,काय घ्यायचे ,एखाद्या कलाकृती कडे कसे पाहावे ,निदान कसे पाहणे समाजाच्या दृष्टीने हिताचे ठरेल इ. आणि याला उत्तर शोधावेच लागतेआणि ती नजर स्विकारावी लागते. पाण्याने भरलेला अर्धा ग्लास आहे, कुणाला तो ग्लास अर्धा भरलेला दिसतो. तर कुणाला अर्धा रिकामा. मी 3 Idiots पाहून ”बाबा रांछोडदास की जय” म्हणेन. तर कोणी हट! काय बोगस चित्रपट होता. फरक नजरेचा असतो. आपला दृष्टिकोन बराच फरक पाडू शकतो हेच आपण विसरलो होतो. त्याची जाणीव पुन्हा या चित्रपटाने करून दिली, इतकेच. बाकी, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा ऍंगल बदलणे हेसुध्दा त्या प्रश्नाचे उत्तर असु शकते नाही का? काय म्हणता…..?
>मेळाव्यानंतर….
>कालचा रविवार मराठी साहित्य क्षेत्रातला एक ऐतिहासिक रविवार आहे हे आपण सारे जाणतोच. अभिव्यक्तीचे नवे माध्यम असलेल्या ब्लॉगर्सनी एकत्र येणे ही काही खायची गोष्ट नाही.. याच मेळाव्याला काही अपरिहार्य कारणामुळे ( परीक्षा हो राव ,बाकी काही नाही) मी येऊ शकलो नाही .पण दिपक दादा आणि पंकज याना फोन करुन सारखे पीडत होतोच. असो या निमित्ताने आणि काही वृत्तांत वाचुन मनात जे विचार आले ते मांडत आहे. चुक भुल समजुन घेणे
- ब्लॉग हे एक माध्यम आणि एक ताकद म्हणून पुढे येणे गरजेचे आहे, गेले कित्येक दिवस ते तसे येत नव्हते . पण या बैठकीमुळे ते तसे आलेले आहे, याचा आनंद आहे.यासाठी पेठेकाका , दिपक दादा ,अनिकेत यांचे मनापसुन आभार.मात्र यासाठी सतत प्रयत्न करणे गरजेचे आहे. आजकाल ब्लॉग हे नाव लोकाना माहित आहे पण मराठीत ब्लॉगिंग करणे कोणाला माहित नाही. आणि काही टुकार लेख लिहून ,ज्याना ब्लॉगिंग माहितही नाही असे लोक विविध माध्यमातुन ब्लॉग विषयी बोलत आहेत. हे घ्या उदाहरण
- http://72.78.249.125/Sakal/21Jan2010/Enlarge/Kolhapur/KolhapurToday/page8.htm
- असे होऊ नये यासाठी प्रत्येक ब्लॉगरने यासंबंधी प्रयत्न करणे गरजेचे आहे.( मी तसा प्रयत्न केला असुन आत्तापर्यंत सकाळ मुक्तपीठ चा वापर करुन मराठी नेटविश्वाची माहिती देणारे तीन लेख लिहिलेले आहेत)
- आजही मराठी ब्लॉग विश्वाचा विकास होणे गरजेचे आहे. विकासामध्ये सर्वसाधारणपणे गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ अपेक्षित असते ,यासाठी ब्लॉग लिहिण्यासाठी इतराना तर प्रवृत्त केले पहिजेच, पण जे लेखक आहेत ,किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्यांनी ब्लॉग विश्वात प्रवेश करायला हवा. यासंबंधी तीन लोकांना मी तयार केले असुन लवकरच त्यांचे ब्लॉग सुरु होतील . पण या दृष्टीने सातत्यपूर्ण प्रयत्न गरजेचे आहेत. हे सगळे सांगायचे कारण असे की कितिही झाले तर आज नियमित मराठी ब्लॉगर ची संख्या ५०० च्या वर जाणार नाही ,आणि ८ कोटी जनतेत ५०० म्हणजे किस झाड की पत्ती त्यामुळे आपल्या कामात अडथळे येऊ शकतात.
- विविध लेख लिहिण्याच्या निमित्ताने बर्याच वृत्तत्रातील संपादकांशी आणि इतर लोकांशी बोलायची संधी मिळते तेव्हा एक गोष्ट ध्यानात येते की बरेच लोक ब्लॉग ला समांतर माध्यम मानत असुन त्याला मुख्य प्रवाहात समाविष्ट करणे अवघड जात आहे. यासाठी आपण आणि विशेषतः ब्लॉगर पत्रकारानी प्रयत्न करायला हवा. मध्यंतरी ब्लॉगवरील लेख सकाळ छापायचे पण तेही आता बंद झाले आहे…
- येथे एक मुद्दा मांडावा वाटतो ,स्पष्ट बोलायचे तर सध्य स्थितीत मराठी संकेतस्थळांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. क्वालिटी की क्वांटीटी या वादात त्यांनी त्यांची लय हरवली असुन सध्या कोणतेही संस्थळ लिहायच्या दृष्टीने योग्य नाही आणि म्हणुनच बरेचसे ब्लॉगर अशा साइट पासुन कटाक्षाने दुर आहेत. तेव्हा मला असे वाटते की आपण ब्लॉगरने असे एखादे संस्थळ उभे करणे गरजेचे आहे. याची कारणे अशी आहेत
- १. आज आपण ब्लॉगर आपल्या ब्लॉगवर लिहितो ,आणि येणार्या कॉमेंट मधुन त्यावर चर्चा होते .
- २. या कॉमेंटला लिमिटेशन आहेत. उदा . एखाद्याने ब्लॉगवर लिहिले आहे हेच आपल्याला बर्याचदा वेळेवर कळत नाही ,कारण मराठी ब्लॉग्स्वर सतत अपलोडींग होत असल्याने ब्लॉग लगेच खाली जातो. शिवाय कमेंट देताना वर्ड वेरिफिकेशन वगैरे अनेक झंझटीमधुन जावे लागते.
- ३. यावर उपाय म्हणुन मिसळ पाव किंवा मनोगत सारखे संस्थळ निर्माण करावे ज्यावर रजिस्टर होण्यासाठी आपण ब्लॉगर असणे ही एक्मेव अट असावी .सर्व ब्लॉगरनी ब्लॉगवरच लिखाण करावे .पण ज्यावर व्यापक चर्चा ,उहापोह अपेक्षित आहे ते लेख त्यानी अशा साइट्वर टाकवेत त्यामुळे मराठीतच ( आज बर्याचशा ब्लॉगवर मराठी प्रतिक्रिया येत नाहीत ,कॉपी पेस्ट ला वेळ नसल्याने) आणि नीट चर्चा होईल .
- ४. कधीकधी एकाच ताज्या घडामोडीवर वेगवेगळे ब्लॉगर लिहितात ,ते पहायला प्रत्येक ब्लॉगवर जावे लागते, काँमेट वाचायला पुन्हा… हे टाळता येईल . तेव्हा स्वतःची आणि ब्लॉगची आयडेंटीटी जपत असे संस्थळ साकारता येइल .दिपक दादा आणि ||राजे|| हे ब्लॉगर यासाठी मदत करु शकतात.
- ब्लॉग च्या माध्यमातुन बर्याचश्या उपक्रमाना मदत करता येइल. उदा .मराठी अभिमान गीत इ.
- आजही ब्लॉगमध्ये विषय विविधता कमी आढळते यासाठी प्रयत्न हवे आहेत.
- बाकी मेळाव्यात मांडले गेलेले सर्व विचार उत्तम आहेतच. आणि या सर्व उपक्रमात मी सक्रिय सहभागी असणार आहेच हे वेगळे सांगणे न लगे .मात्र पुढील आखणी होताना या बाबींचा विचार गरजेचा आहे असे वाटते
- प्रेस कॉन्फरंस आणि संमेलनाध्यक्षाना भेट हे मुद्दे उत्तम आहेत. त्या आगोदर ग्रुप च्या माध्यमातुन प्रत्येक ब्लॉगचा लेखक आणि त्याचा ई-पत्ता प्रत्येकाला मिळावा अशी विनंत्ती आहे.त्यामुळे कोणाचे कशात स्पेशलायजेशन आहे तेही कळेल, उदा नीधप- वेशभुषा ,भुंगा- नेट इ. आणि त्याचा इतराना फायदा होईल, माहिती मिळेल.
- बाकी प्रकाशकांचे सहकार्य आहे ते उत्तमच पण नेटभेट आणि ई =बुक चळव ळ वाढवायला हवी
- असो, हे मुद्दे आता सुचले असेच काही मुद्दे मांडणारा प्रसन्न जोशींचा साधनातला लेख अपुरा असला तरी वाचनीय आहे तो तुम्ही इथे वाचु शकटा .
- http://weeklysadhana.com/index.php/2009-12-21-10-09-25/cat_view/38— ९ जानेवारीचा अंक
या सर्व उपक्रमात माझे पुर्ण सहकार्य, पुढाकार आणि सहभाग राहिल …
असो
आता थांबतो
जाता जाता- अजुन मुद्दे तुम्ही सांगालच ,काय?
घोषणा – रंगकर्मी .कॉम पुन्हा येत आहे ,थोड्याच दिवसात….
आपला,
विनायक
वेळ नव्हता ,पण लिहायचे होते म्हणून लिहिले आहे. टायपिंग चुकाना समजुन घ्या व माफ करा.
>चेतन भगतला एक अनावृत्त पत्र
>
आनंदाची गोष्ट- हे अनावृत्त पत्र वाचण्यापुर्वी एक आनंदाची गोष्ट, सदरचा लेख (पत्र) हे महाराष्ट्रातील एक दर्जेदार साप्ताहिक “साप्ताहिक साधना” च्या या आठवड्याच्या ( ९ जानेवारी २०१०) च्या अंकात प्रकाशित झालेले आहे. तो अंक मी लवकरात लवकर नेटवर उपलब्ध करुन द्यायचा प्रयत्न करत आहे. माझ्या पत्राला योग्य व्यासपीठ दिल्याबद्दल साधनाचे युवा संपादक विनोद शिरसाठ यांचे जाहिर आभार.
सुचना- मागे म्हटल्याप्रमाणे सध्या लेखणीला विश्रांती आहे, त्यामुळे हा लेखही पुर्वलिखित आहे, साहजिकच यात थ्री इडियटस चे संदर्भ नाहीत, फक्त हा लेख प्रकाशित होण्याची वाट पाहत होतो त्यामुळे तो आज प्रकाशित करत आहे.
विनंती- या अंकाचा अधिकृत प्रकाशन सोहळा १२ जानेवरी २००९ रोजी प्रख्यात दिग्दर्शक सचिन कुंडलकर व विवेक सांवत यांच्या हस्ते साधना मिडीया सेंटर ,शनिवार पेठ ,पुणे येथे होत आहे. या कार्यक्रमास आपण जाऊ शकल्यास आनंद आहे. मात्र जाणार असल्यास ब्लॉगवर कळवण्यास विसरु नका.
विनायक
>तुम चलो तो… !!!
>
अर्धविराममित्रानो, २००९ संपतय,२०१० उजाडतोय. वर्षभरातला हा माझा ५५ वा लेख. या वर्षाने मला खुप काही दिले. अनेक मित्र , प्रगल्भता आणि बरेच…. पण आता मात्र थोडा अर्धविराम घेतोय. येते वर्ष माझ्यासाठी खुप महत्त्वाचे आहे .या वर्षात बारावीसह काही महत्त्वाच्या परीक्षाना मी सामोरा जात आहे. तेव्हा १० मे पर्यंत लेखणी म्यान करण्याचा निर्णय घेऊन मी ब्लॉगला अर्धविराम देत आहे. मात्र माझे काही जुने अप्रकाशित लेख प्रकाशित करुन मी ब्लॉगला लाईव्ह ठेवण्याचा प्रयत्न नक्की करणार असुन रंगकर्मी .कॉम हा उपक्रमही येत्या १० दिवसात नव्या जोषात पुन्हा चालु होत आहे. तेव्हा मिलेंगे छोटेसे ब्रेक के बाद..तुमचाच
विनायक





